Share

शेतकरी आंदोलन लवकर मागे घेतले नाही तर…,’सीआयआय’ने दिला धोक्याचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. कोरोना संकटामुळे अडचणीत आलेली भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सावरण्याच्या प्रयत्नात असताना शेतकऱ्यांच्या लांबत चाललेल्या आंदोलनामुळे ती पुन्हा धोक्यात येऊ शकते असा इशारा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने दिला आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जाणार नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात ३२ शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. आंदोलकांनी मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडले आहे सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या आतापर्यंत निष्फळ ठरल्या आहेत. मात्र, शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

शेतकरी आंदोलनामुळे अन्न धान्य व इतर शेतमालाच्या वितरणाची साखळी खंडीत होण्याची भीती आहे. आंदोलन दीर्घकाळ सुरु राहिल्यास वितरण व्यवस्था ठप्प होऊन भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. असा इशारा ‘सीआयआय’ने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!