Share

‘राज्याचे मंत्री टू-व्हीलरने दिल्लीला जातात, पण आधी महाराष्ट्रात तरी दिवे लावा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या आधीच विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. आज या अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालं.

परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई व इतर कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं, मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांना १ रुपयाही मिळाला नसल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला लक्ष्य केलं.

दरम्यान, त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. बच्चू कडू सद्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील काही शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीने दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनात गेले आहेत. तर, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

‘या महाविकास आघाडी सरकारचे मंत्री टू-व्हीलरने दिल्लीला जातात, पहिले महाराष्ट्रात तरी दिवे लावा. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला तरी न्याय द्या, खात्यात पैसे तरी टाका’ असा घणाघात रवी राणा यांनी केला असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी निलंबन झालं तरी चालेल अशी भूमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!