Share

एक कायदा मागे घेतला तर सर्वच कायदे मागे घ्यावे लागतील: रामदास आठवले

Published On: 

नांदेड : एक कायदा मागे घेतला तर सर्वच कायदे मागे घ्यावे लागतील अशी शंका केंद्र सरकारच्या मनात आहे. त्यामुळे केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत नाही असे केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. नांदेड येथील लोहा तालुक्यात शिवनी जामगा येथे ते बोलत होते. यावेळी केंद्र सरकार तडजोडीला तयार असल्याचे मतही त्यांनी मांडले.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात मागील ९० दिवसापासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १२ बैठका घेतल्या. मात्र या बैठकीतून काहीच तोडगा निघाला नाही, यामुळे शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहे. असे रामदास आठवले यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्हीही आंदोलन केले पण कोणाला त्रास न देता आंदोलन केले. काही वेळा आम्ही दोन पावले मागे पण आलो आहोत. नांदेड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते

आंदोलनातील ९० टक्के शेतकरी पंजाब राज्यातील असल्याचे त्यांनी सांगितले. जर एखादा कायदा मागे घेतला तर आतापर्यंत पारीत केलेले सर्वच कायदे मागे घ्यावे लागतील अशी शंका केंद्र सरकारला वाटत आहे. यामुळे कायदे मागे घेणे शक्य नाही, मात्र केंद्र सरकार हे तडजोडीला तयार आहे. असे केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!