Share

‘संजय राठोड यांच्यावर कारवाई झाली नाही तर जनतेचा पोलिसांवरचा विश्वास उडेल’

Published On: 

सातारा : ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. या तरुणीचे संबंध हे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडल्याचे आरोप होत असून कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्ज देखील आता समोर आले आहेत. यामुळे संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

मात्र, संजय राठोड यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून अद्यापही ते पदावर कायम आहेत. राठोड यांनी २३ फेब्रुवारीला पोहरादेवी येथे जाऊन संत सेवालाल महाराज व देवीचं दर्शन घेतलं होतं. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संबंधी केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखवत हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. यात शिवसेनेचे नेते देखील सहभागी झाले होते.

यामुळे, संजय राठोड यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली असून महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष देखील नाराज झाले आहेत. दुसरीकडं, भाजप देखील राठोड यांच्यावर कारवाई केली जावी यासाठी दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. यावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘या प्रकरणात योग्य शासन झालंच पाहिजे. संजय राठोड यांच्यावर कारवाई झाली नाही तर जनतेचा प्रशासन आणि पोलिसांवरच विश्वास उडेल,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!