Share

‘…जर कोहलीला विश्रांती हवी होती तर त्याने सांगायला हवे’

Published On: 

मुंबई : भारत-इंग्लंड यांच्यामधील तिसरा वन डे सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यस्त वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली. कोहलीने व्यस्त वेळापत्रकावर माध्यमांशी बोलताना टीका केली होती. इंगलंड विरुद्धची एकदिवशीय मालिका खेळवली नसती तर संघाला पुरेशी विश्रांती मिळली असती असे देखील कोहली म्हणाला होता. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बायो बबलमध्ये (जैव सुरक्षित वातावरण) राहून आंतरराष्ट्रीय मालिका खेळणे सोपे नसते असेही त्याने बोलून दाखवले आहे.

त्यावर बीसीसीआयने गांभीर्याने दखल घेतली. यापुढे प्रत्येक मालिकांमध्ये खेळाडूंना खेळण्यासाठी बीसीसीआय दबाव टाकू शकणार नाहीत. शिवाय अति क्रिकेट खेळून शारीरिक व मानसिकरीत्या खेळाडू थकले असतील तर त्यांना मालिकेमधून माघार घेण्याची मुभाही देण्यात येईल असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. बीसीसीआय खेळाडूंना सर्व सामने खेळण्याची जबरदस्ती करत नाही. तसेच कोहलीला जर विश्रांती हवी होती तर त्याने तसेच सांगायला हवे होते. बीसीसीआयने त्याला ही परवानगी दिली असती.

भारतीय संघातील खेळाडूंवर सगळेच सामने खेळले पाहिजेत, अशी जबरदस्ती केली जात नाही. सध्या संघाचा सेकंड बेंच भक्कम आहे, त्यामुळे संघाकडे खूप पर्याय आहेत. अशा स्थितीत ज्या खेळाडूंना विश्रांती हवी असेल त्यांनी बीसीसीआयशी संवाद साधला पाहिजे असे थेट माध्यमांशी बोलू नये, असेही बीसीसीआयने कोहलीला सुनावले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!