नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या विधानसभेत मोदींना धूळ चारून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी या कालपासून दिल्ली दोऱ्यावर आहेत. त्यांनी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. दिल्लीत येऊन राजकीय पक्षांच्या भेटीगाठी घेत असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भाजपवर वार करण्यास सुरुवात केली आहे.
आज माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या कि, संसदेतही काम होत नाही. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती आहे, अशी घणाघाती टीका करतानाच सर्व विरोधक एकत्रित आल्यास सहा महिन्यातच चांगले परिणाम दिसतील, असा सूचक इशाराच ममता बॅनर्जी यांनी आज दिला आहे.
तसेच यावर पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘माझा फोनही हॅक करण्यात आला होता. अभिषेक आणि राजनीतीकार प्रशांत किशोर यांचा फोनही हॅक करण्यात आला होता. फ्रिडम ऑफ प्रेसही उरलेलं नाही, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. पेगासस हा एक खतरनाक व्हायरस आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षेला धोका पोहोचला आहे. संसदेचं काम सुरू नाही. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. सध्या तरी आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती आहे,’ अशी घाघाती टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी यांनी, ‘सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र यायला हवं. आम्ही सर्व एकत्र बसू व यातून मार्ग काढू.’ असं बॅनर्जी यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी त्यांना, विरोधी पक्षांचं नेतृत्व कोण करेल असा प्रश्न विचारला असता, ‘याबाबत सांगायला मी काही ज्योतिषी नाही. कोणीतरी पुढे येईल, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.’ असं सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाचे नियम धाब्यावर टाकत धुमधडाक्यात लग्न, चंद्रकांत पाटीलसह अनेकांची उपस्थिती
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- ‘दहशतवाद्यांविरोधात वापरण्याचे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?’
- पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न
- धोनीचा शिलेदार पुणेकर ऋतुराज आज करु शकतो आंतरराष्ट्रीय पदार्पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
