🕒 1 min read
कराड: भाजप नेते किरीट सोमय्या यांची लाईव्ह पत्रकार परिषद कराड येथे सुरु आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात जाणार होते. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. तर, आज त्यांना कराड येथेच पोलिसांनी रोखलं आहे. यावरच त्यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेत आहेत.
यावेळी किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेता आलं नाही. तसेच मला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना विचारायचं आहे, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत मला गणेश विसर्जनापासून रोखलं? असा सवालही त्यांनी केला आहे. तर ठाकरे सरकारवर टीका करत त्यांनी म्हटले आहे की, ठाकरे सरकारने इतिहास रचला आहे. आज घोटाळेबाजांऐवजी ठाकरे सरकार घोटाळे समोर आणणाऱ्यांना अटक करतंय.
ठाकरे सरकारची ही सर्व ठोकशाही आहे. मला गणेश विसर्जनापासून रोखलं, अंबाबाईच्या दर्शनापासून रोखलं, csmt स्टेशनबाहेर मला रोखलं, एवढेच नाही तर मला धक्काबुक्कीही करण्यात आली. मी विचारलं की, कोणत्या अधिकाराअंतर्गत मला रोखताय, त्यावर त्यांनी मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांबाहेर जाण्यापासून रोखण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने दिला.असे सांगण्यात आले. मात्र यावर मी आक्षेप घेतला. मला ते पत्र दाखवण्यात यावे. अन्यथा पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘सोमय्यांना रोखून भ्रष्टाचारावर पांघरूण पडेल’, या भ्रमातून ठाकरे सरकारने वेळीच बाहेर यावे’
- ‘कोल्हापूरला पोहचण्याआधीच पोलिसांचा मज्जाव, सोमय्यांना कराड येथे रोखलं’
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
