Share

‘देशाने शेतीसाठी किती योगदान दिलं?’ नितीन गडकरींचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

नागपूर :देशात नव्या कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याने ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. गेल्या महिन्या भरापासून दिवस दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.

यावरून गेल्या महिना भरापासून राजकारण देखील तापले आहे. तर वेळोवेळी सरकार आणि शेतकऱ्यांमधील चर्चा निष्फळ होत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देखील विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वात दिल्ली सीमेकडे कूच करत आहेत.

यावर आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शेती क्षेत्रामध्ये देशाने किती योगदान दिलं आहे. असा सवाल उपस्थित केला आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशना मध्ये बोलत होते.

गडकरी म्हणाले, शेती उत्पादनांची किंमत कमी आणि त्या पासून निर्माण केलेल्या उत्पादनांना जास्त किंमत मिळते. शेतकरी निर्माण करत असलेल्या वस्तूंना किंमत नाहीय. तर बियाणे आणि खते देखील महाग होत आहेत. आज ही स्थिती का झाली आहे ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी शेती व्यवसायाची अवस्था बिकट असल्याची कबुली दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!