🕒 1 min read
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून ३५० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकारने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. आता यावरच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका करत संतप्त सवाल केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? असा संतप सवाल प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारला केला आहे. आत्तापर्य़ंत 372 कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तसेच 39 कर्मचारी आपल्या प्राणाला मुकले आहेत. असा संताप भाजपने व्यक्त केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप:कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल
https://t.co/4dvUa8NEsC— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 11, 2021
दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक सूचक ट्विट केले असून त्यामध्ये ‘जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही’, असे ते म्हणाले आहेत. तसेच काल रात्री एसटी कर्मचाऱ्यांसमवेत जेवण करुन आझाद मैदानावरच मुक्काम केला असल्याचीही माहिती यावेळी पडळकरांनी दिली. या ट्विट सोबतच #लढा_विलिनीकरणाचा या हॅशटॅगचा वापर त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन चंद्रकांत पाटलांचा टोला
- नवाब मलिक स्वत:ची कबर स्वत:च खोदत आहेत; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- जेवढे कर्मचारी दाबाल तेवढे उसळून उठतील- प्रविण दरेकर
- राज्याच्या हिताच्या दृष्टीने एकदा विचार करा; संजय राऊतांचं कर्मचाऱ्यांना आवाहन
- कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

