Share

विरोधी बाकावर किती दिवस बसणार ? ; फडणवीसांचे मोठे विधान म्हणाले…

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात 43 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. हा समावेश करताना जुन्या 12 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांसह मोदी पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. या बदलाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. यातच आज विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. ‘जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत आम्ही विरोधात बसणार आहोत,’ असे मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी आता किती दिवस विरोधात बसणार?, असा सवाल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी सूचक विधान केलं. ‘जितका काळ विरोधात बसायचं, म्हणजे आम्हाला आज्ञा असेल तोपर्यंत विरोधात बसणार’ असे उत्तर त्यांनी दिले आहे.

तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना मोदी सरकारने मंत्री बदलले,पण डबे बदलून उपयोग नाही तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवं अशी बोचरी टीका केली होती. याचा देखील यावेळी फडणवीसांनी चांगलाच समाचर घेतला आहे. ते डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे हे त्यांचे वक्तव्य काँग्रेसबद्द्दल बोलत आहे का? असा प्रतिसवाल उपस्थित करतानाच ते म्हणाले इंजिनचा प्रॉब्लेम हा काँग्रेस पक्षाला आहे. जो केंद्रातही आणि राज्यातही आहे. असा खरमरीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!