Share

प्रत्येक अधिवेशनात केवळ चर्चा-घोषणा कसल्या करता?; वीज तोडणीवरून फडणवीस आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र ( Devendra Fadnavis) फडणवीस आज (१५ मार्च) विधानसभेत आक्रमक झाल्याचे दिसून आले. प्रत्येक अधिवेशनात केवळ चर्चा-घोषणा कसल्या करता? असा सणसणीत सवाल करत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले.

“प्रत्येक अधिवेशनात केवळ चर्चा-घोषणा कसल्या करता? त्यातील एकही घोषणा पाळली जात नाही. रोज शेतकरी आत्महत्या करतो आहे. आम्हाला श्रेय नको, हवे तर सत्ताधारी पक्षाची मागणी समजा. पण तातडीने निर्णय जाहीर करा. वीज तोडणे बंद करा आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्या.”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तसेच चर्चा नको, निर्णय करा. रोज शेतकरी आत्महत्या होत असताना सावकारी वसुली सुरू आहे. वीज जोडणी तोडणे बंद करा, ही सर्वांची भावना आहे. आताच्या आता घोषणा करा. तोवर कोणतेही कामकाज करू नका. असा इशारा देत किती शेतकरी मेल्यावर चर्चा करणार? विजेच्या संदर्भात निर्णय होत नसेल तर आमदारांनी मतदारसंघात जायचे कसे? काय उत्तर द्यायचे शेतकऱ्यांना? उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते. सभागृहात दिलेल्या वचनांची काही किंमत आहे की नाही? असा संतापजनक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!