Share

महीला सुरक्षित कशा असतील जेव्हा, रक्षकच भक्षक झालेत…; भातखळकरांचे शिवसेनेवर टीकेचे बाण

Published On: 

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे. अमानुषपणे महिलांवर अत्याचार केले जात आहेत. राज्यात कायद्याचा कसलाच धाक राहिला नसल्याने आरोपींना बळ मिळत आहे. मुंबईमध्ये साकीनाका, पुण्यातील घटना, अमरावती अशा एक ना अनेक ठिकाणच्या घटना रोज कानी पडत असतानाच आता डोंबिवली, कल्याणमध्ये अशाच घटना घडल्या आहेत. यावरुन राजकीय नेते सत्ताधारी महाविकास आघाडीला धारेवर धरत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत.

महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्याच्या दोन मुलांसह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महीला सुरक्षित कशा असतील जेव्हा, रक्षकच भक्षक झाले आहेत…, असं म्हणत भातखळकरांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे.

मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेने देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या सर्व घटना घडत असताना महाबळेश्वरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना समोर आल्याने महाराष्ट्र हा महिलांसाठी असुरक्षित असल्याचं स्पष्ट दिसत आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर टीका-टिपण्णी करुन या मुद्द्याचं राजकारण करत असतात आरोपी मात्र या सगळ्यातून निर्दोष मुक्त होतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!