Share

१२ आमदारांची यादी राजभवन सारख्या सुरक्षित जागेतून हरवतेच कशी ? – शिवसेना

Published On: 

पुणे : काही महिन्यांपूर्वी राज्यात विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणूकीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. आता हाच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आणि आणि माहिती अधिकारातून अशी १२ सदस्यांची कोणतीही यादी विधानभवनात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दासंदर्भात माहिती विचारली होती. त्यावेळी राजभवनाच्या सचिवालयानं यासंदर्भातील यादी उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता यासंदर्भातील यादी कशी गहाळ झाली ? असा सवाल महाविकास आघाडीतील नेत्यांनी विचारला आहे.

यासंदर्भात आता शिवसेना, पुणे शहरचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. याबाबत शिवसेनेचे शहर समन्वयक आनंद दवे म्हणाले, ‘१२ आमदारांची यादी राजभवन सारख्या सुरक्षित जागेतून हरवतेच कशी ? हरवल्याचे कळल्यावर लगेच तक्रार का दाखल केली नाही ? काय चौकशी केली ? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घ्यावे म्हणजे सत्य बाहेर येईल. या मागणीसाठी शिवसेना पुणे शहरच्या वतीने आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांना भेटून चौकशी ची मागणी करणार आहोत. उद्या सकाळी ११.३० वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात ही भेट होईल.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!