🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
या सर्व प्रकरनामुळे अखेर, अनिल देशमुख हे राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ‘देशमुख आपला राजीनामा सोपवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आहेत. न्यायालयाने सीबीआय चौकशी नेमल्यामुळे राजीनामा देण्याची तयारी स्वतः अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे दर्शवली होती. शरद पवार यांनी देखील राजीनाम्याला होकार दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील हा राजीनामा मंजूर करतील,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्राचा नवा गृहमंत्री कोण असा प्रश्न सध्या चर्चे आहे. हे पद हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार केला आहे. तसेच गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचंही नाव समोर येतंय. तसंच हसन मुश्रीफ हे तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती सध्या मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- तब्बल सात वर्षापासून रखडलेली ग्रामीण रुग्णालयाची कामे होणार कधी?
- राम सेतू चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट ; अक्षय पाठोपाठ 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण
- ‘भगीरथच’ पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी भारतनानांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणार – जयंत पाटील
- धक्कादायक! बीड जिल्ह्यात रुग्णालय कर्मचारी-नातेवाईकांत हाणामारी
- ‘राज्यातली कोरोनाची स्थिती भयावह,वीज तोडणी थांबवा आणि गरीब,मध्यम वर्गाला मदत करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
