हिंगोली: राज्यशासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभागी झालेल्या २२२ नगरपालिकेतून हिंगोली नगरपालिकेने राज्यातून पहिला क्रमांक मिळवला आहे. आज या पुरस्काराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण करण्यात आलं. या अभियानात पृथ्वी, जल, वायू या पैकी एका घटकावर काम करून शहराचा चेहरा बदलण्याचे आवाहन करण्यात आले होते. हिंगोली पालिकेने पृथ्वी या घटकावर गेल्या वर्षभरात ५ हजार झाडे लाऊन त्याचं संगोपन केलं आहे.
जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र कोरोनाचे नियम पाळून सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्ताने वृक्षारोपण तसेच अनेक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. गेल्या दशकात ज्या देशांमध्ये वनक्षेत्र वाढला आहे अशा देशांमध्ये भारताचा देखील समावेश झाला आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे, ते आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलत होते. गेल्या सहा वर्षात वन आणि वृक्ष क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे या वेळी जावडेकर यांनी सांगितलं.
पर्यावरण दिनानिमित्त शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते ‘मियावाकी’ पध्दतीने वृक्ष लागवड करुन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. मियावाकी पध्दतीने २१ हजार वृक्षाची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. असेच प्रत्येक गावाने पुढाकार घेऊन वृक्ष लागवडीचे काम करावे असे आवाहन देखील या वेळी करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून वकीलासह बेरोजगारांना गंडविणाऱ्यास न्यायालयीन कोठडी
- ट्विटरवर केंद्राचा दबदबा ; इशारा देताच मोहन भागवतांसह अन्य नेत्यांचे ब्ल्यू टीक परतले
- ‘तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल’ ; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
- उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा, भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
