मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळांच्या परिणामामुळे राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. सध्या मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातही पाऊस होत आहे.
आता नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे. यावर आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारकडे मदत मागणार असल्याचे सांगितले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून केंद्र सरकारने राज्याला 7 हजार कोटी रुपये मदत द्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह ऊस आणि अन्य पिकांचे देखील नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मंत्री वडेट्टीवार यांनी मराठवाड्यातील नुकसान पाहणी केली. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारने सुद्धा राज्याला मदत द्यायला हवी असे सांगितले. या प्रकरणी विरोधी पक्षातील नेत्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान आता हवामान विभागाने आज आणि उद्या देखील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यातही अति मुसळधार पाऊस होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अश्विनला बाद केल्यानंतर साऊदी आणि मॉर्गनने डिवचलं अन् चिडलेल्या अश्विनने…
- भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या; शिवसेना आमदाराला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- ‘ईडीला उत्तरं देणं ही माझी जबाबदारी मात्र कुणा वैयक्तिक व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही’
- सातत्याने जावयाचं नाव घेऊ नका, हे काही बरोबर नाही; हसन मुश्रीफ संतापले

