मुंबई : राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत प्रचंड पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे. मात्र येत्या २३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे.
Isolated extremely heavy falls also very likely over Konkan & Goa & adjoining Ghat areas of Madhya Maharashtra during 23rd-24th July with reduction thereafter and over Coastal and south Interior Karnataka, today the 23rd July.
— India Meteorological Department (@Indiametdept) July 23, 2021
रायगड जिल्ह्यात पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गावात ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. तसेच पोलादपूर येथील केवनाळे येथे चार घरांवर दरड कोसळली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुतारवाडी येथेही दरड पडल्याने पाच असा एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही गावातील 13 जखमींना महाड आणि पोलादपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकंदरीत अशी परिस्थिती असताना हवामान विभागाकडून पुढील २४ तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर पुढचे २ ते ३ दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे. उद्या (२४ जुलै रोजी) देखील हे प्रमाण कायम राहणार असून त्यानंतर ते कमी होऊ शकते. तर कर्नाटकमध्ये किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटकमध्ये आज दिवसभर अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती,19 तासानंतरही मदत नाही
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांची राजनाथसिंह यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

