पुणे : कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, असं खुलं आव्हान देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शड्डू ठोकला आहे.
मागील वर्षी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला अमित शाह यांनी सांगितले की, आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता?, असं कळवल्याचं देखील सांगितलं.
मात्र, यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. ‘चंद्रकांतदादांना हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही. आम्हाला इथेच त्यांची गरज आहे,’ असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलेलीच नाही,’ असं ते म्हणाले. ‘विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेलं आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळं चंद्रकांतदादांसाठी राजीनामा कोण देणार? कशासाठी? हे होणार नाही, हे दादांनाही माहीत आहे. त्यामुळंच ते हिमालयात जाण्याची भाषा करत आहेत,’ असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
‘ज्या कोथरुडमधून मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांतदादा निवडून आले आहेत, ती जागा सोडण्याची परवानगी भाजप कशी देईल? दोन्हीही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळं पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हाला तुमची इथेच गरज आहे,’ असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- कपिल देव यांच्या निधनाच्या अफवांवर माजी क्रिकेटपटू मदन लाल भडकले
- कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन आज होणार ऑनलाईन मेळावे
- देशातील कोणत्याही नागरिकाला सीएएचा धोका नाही- भागवत
- भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावंच लागेल – मोहन भागवत
- चंडीगडमध्ये होणार ‘जर्शी’चे पुढील चित्रिकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

