Share

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मुश्रीफ आज नगर दौऱ्यावर; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : परतीच्या पावसाने अहमदनगरला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. पालकमंत्री या नात्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आज नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. हा मतदारसंघ भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचा आहे. त्यामुळे पाहणी, पंचनामे, मदत पुरेशी मिळेल का? जिल्ह्यात इतर तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री केवळ दोनच ठिकाणी पाहणी करणार असल्याने इतर तालुक्यांनाही नुकसान भरपाई मिळेल का? अशी शंका शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांनी दौरे सुरू केले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील नेतेही परिस्थितीची पाहणी करण्यास उतरले आहेत. त्यामुळे पालकमंत्री मुश्रीफ आज सकाळी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील भालगाव व बोधेगाव येथे पिकाच्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी नगरला येऊन अतिवृष्टी आढावा व कोरोना आढावा घेतील. त्यानंतर पक्षातील पदाधिकारी व नेत्यांशी चर्चा करतील. दिवसभराच्या दौऱ्यात ते केवळ दोन गावात नुकसान पाहणी करतील.

आमदार राजळे ह्या भाजपच्या आमदार आहेत विरोधकांच्या मतदारसंघात पालकमंत्री भरघोस मदत देतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. केवळ पाहणी करून अहवाल देऊ नये, तर पालकमंत्र्यांनी तेथेच मदत जाहीर करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांतून होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!