अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पारनेर नगरपंचायत निवडणूकीसाठी दोन दिवसांपूर्वी प्रभागनिहाय आरक्षण सोडत डॉ.आंबेडकर भवन पारनेर येथे उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी डॉ.सुनीता कुमावत यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
नगरपंचायतीच्या निवडणुकीला अद्याप अवकाश असला तरी आतापासूनच राजकीय वातावरण तापले आहे. आपण पारनेर शहराचा केलेला बदल जनतेपुढे आहे. बाहेरचे लोक येथे येऊन १७-० करण्याच्या वल्गना करतात. त्यांचा काय संबंध? गेल्या वर्षभरात त्यांचा एक रुपयाचा निधी पारनेर शहराला मिळाला का? असा सवाल माजी आमदार विजय औटी यांनी आमदार निलेश लंके यांना केला आहे.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दोघांनीही १७-० करण्याचा नारा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे शिवसेना, राष्ट्रवादी हे दोन्ही घटक पक्ष सरकारमध्ये सामील असले तरी पारनेरमध्ये मात्र सेना, राष्ट्रवादी अशीच लढत रंगणार आहे. या दोघांनीही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे तर काही प्रभागातील उमेदवार देखील निश्चित झाल्याची माहिती समजते.
निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी म्हणाले की, आपण पारनेर शहराचा केलेला बदल जनतेपुढे आहे. या निवडणुकीत आपण सर्व १७ जागा जिंकू असा विश्वास औटी यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केला. गेल्या वर्षभरात त्यांचा एक रुपयाचा निधी पारनेर शहराला मिळाला का? असा सवालही माजी आमदार औटी यांनी केला.
दरम्यान अद्याप निवडणूक जाहीर झाली नसताना राजकीय फटाके फोडण्यास सुरूवात झाली आहे. यावरूनच ही निवडणूक प्रतिष्ठेची, अटीतटीची होणार यात शंकाच नाही. उमेदवारांपेक्षा माजी आमदार औटी व आमदार लंके यांच्या भोवतीच या निवडणुकीचा केंद्रबिंदू राहणार असल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या
- ठरलं तर…! नितीशकुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री?
- ‘हे अत्यंत लज्जास्पद’; विमानतळावर सोशल डिस्टंसिंग फज्जा उडालेला जुही चावलाचा संताप…
- भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका !
- राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांचा ‘बंटी और बबली पार्ट 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…
- कॅप्टन कूल ‘धोनी’ आता करणार कडकनाथ कोंबड्यांची विक्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

