Share

“हार्दिकला परत संघात आणू नकोस”; माजी खेळाडूचा रोहितला सल्ला

Published On: 

मुंबई: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या बऱ्याच दिवसांपासून संघातून बाहेर आहे. निवड समिती अशा खेळाडूच्या शोधात होते की, जो संघात हार्दिकची कमतरता भरून काढू शकेल.आणि त्यांना व्यंकटेश अय्यरच्या रूपाने तो खेळाडू मिळाला असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भारताचा दिग्गज फलंदाज वसीम जाफरनेही हार्दिकला विश्वचषक संघात पुन्हा संधी देऊ नये, असा सल्ला दिला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाचा उगवता स्टार व्यंकटेश अय्यरने अप्रतिम कामगिरी केली. व्यंकटेशने चेंडूसह २ बळी घेतले, तर त्याच्या बॅटने केवळ १९ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या आहेत. व्यंकटेशमध्ये एक नवा फिनिशर आणि चांगला अष्टपैलू खेळाडूही संघाला मिळाला आहे. आता वसीम जाफरने तर हार्दिकच्या आधी व्यंकटेश अय्यरला विश्वचषक संघात स्थान दिले पाहिजे, असे म्हटले आहे. यावेळी व्यंकटेश हार्दिक पांड्यापेक्षा खूप पुढे गेला असून त्याला आणखी संधी द्यायला हवी, असे जाफरचे म्हणणे आहे.

व्यंकटेश अय्यरने आयपीएलमध्ये १० सामन्यांमध्ये ३७० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश आहे. अष्टपैलू व्यंकटेश अय्यरचा गोलंदाज म्हणून टी-२० मध्ये उत्कृष्ट विक्रम आहे. व्यंकटेश अय्यरने एकूण ५९ टी-२० सामन्यांमध्ये ३२ विकेट घेतल्या आहेत. व्यंकटेश अय्यरने १० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये७ विकेट्स आणि २४ लिस्ट ए सामन्यांमध्ये १९ विकेट्स घेतल्या आहेत. व्यंकटेश अय्यरने आपल्या चमकदार कामगिरीने दाखवून दिले की आता हार्दिक पंड्याचे संघात पुनरागमन सोपे असणार नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!