Share

हार्दिक पांड्याने प्रमुख टूर्नामेंटमध्ये न खेळण्याचा घेतला निर्णय

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) दीर्घकाळापासून फिटनेसच्या समस्येशी झुंज देत आहे आणि हे लक्षात घेऊन त्याने 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) या प्रमुख देशांतर्गत स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे आणि निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे घोषित केले आहे. हार्दिक सध्या फिटनेस परत मिळवण्यासाठी मुंबईत रिकव्हरी प्रक्रियेत आहे.

हार्दिक पांड्या बर्‍याच प्रसंगी फलंदाज म्हणून खेळताना दिसला आहे आणि त्याने फार कमी गोलंदाजी केली आहे. नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकातही हार्दिकच्या तंदुरुस्तीची समस्या कायम राहिली आणि त्यामुळेच त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या T20 मालिकेतून वगळण्यात आले.

त्याने बडोदा निवड समितीला स्पष्ट केले आहे की त्याला त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्या कारणास्तव तो उपलब्ध नाही. बडोदा क्रिकेट असोसिएशनने (बीसीए) हार्दिकला विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल विचारण्यासाठी ई-मेल पाठवला होता. गेल्या तीन वर्षांत तो बडोद्याकडून फार कमी खेळला आहे.

हार्दिकच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र, हार्दिकला कोणत्या प्रकारची दुखापत झाली आहे, याबाबत अधिकाऱ्याला विचारले असता ते म्हणाले, सीएलाही याबाबत माहिती नाही. असे दिसते की तो त्याच्या पाठीसाठी काही ताकद आणि कंडिशनिंग मॉड्यूल करण्याचा प्रयत्न करीत आहे जे 2019 मध्ये शस्त्रक्रियेनंतर आता चांगल्या स्थितीत नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!