Share

ज्यांचा अर्धा पक्ष उपऱ्यांच्या भरवशावर… काही उमेदवार तर त्यांना आम्हीच दिले- देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाना साधला होता. उद्धव ठाकरेंनी केलेले सर्व आरोप खोडून काढण्यासाठी भाजपा नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांचा अर्धा पक्ष उपऱ्यांच्या भरवशावर त्यांनी आम्हाला का सांगावे? काही उमेदवार तर त्यांना आम्हीच दिले. असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

संघराज्य व्यवस्था बदलण्याचे मनसुबे मुख्यमंत्री बोलून दाखवितात. म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याची भाषा! काहीही झाले तरी हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही! असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एजन्सींच्या वापराच्या विरोधात आहे. कधीही ते एजन्सीचा गैरवापर करू देत नाहीत. एजन्सीच्या कामातही येत नाहीत. एजन्सीचा राजकीय वापर करू देत नाही. त्यांनी एजन्सीचा वापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं. असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

ईडी, सीबीआय. ती का येते? ती आम्ही नाही आणली. त्याचे कारण म्हणजे तुम्ही ज्या सरकारचे नेतृत्व करत आहात ते भ्रष्ट सरकार आहे. इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. खंडणी उकळणं हाच या सरकारचा अजेंडा आहे, असा आरोपही फडणवीसांनी यावेळी केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!