टीम महाराष्ट्र देशा: भारतासाठी महत्वाकांक्षी असणाऱ्या ‘चंद्रयान २’ चे विक्रम लॅडर चंद्रावर उतरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या कार्यालयात असल्याने अपशकून झाला. मोदींचे अपशकुनी पाय इस्त्रोमध्ये लागल्यानेचं संशोधकांसाठी दुर्भाग्य ठरले, असे विधान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केले आहे.
कुमारस्वामी म्हणाले की, जसे काय मीच चांद्रयान-2 चंद्रायवर लॅण्ड करणार आहे असा संदेश देण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगळुरूला आले होते. या मोहिमेसाठी संशोधकांनी तब्बल 10 ते 12 वर्ष कठोर मेहनत केली. परंतु मोदी फक्त प्रचाराच्या दृष्टीने आले होते. त्यांनी इस्रोमध्ये पाय ठेवला आणि तो क्षण संशोधकांसाठी दुर्भाग्याचा ठरला.
भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर असताना त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे लँडरची दिशा आणि ठिकाण कळण्यात संशोधकांना अडचणी निर्माण झाल्या. विक्रमसोबतचा संपर्क तुटल्यानं इस्रोसह देश निराश झाला. लँडरशी संपर्क तुटल्यानं मोहिमेला 5 टक्के धक्का बसला आहे. यामुळं चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही. मात्र 95 टक्के काम सुरू राहणार आहे. ऑर्बिटरच्या सहाय्यानं इतर माहिती मिळत राहणार आहे.
हे सरकार गरिबांचे सरकार आहे : रावसाहेब दानवे
… तर युतीच्या ११ आणि आघाडीच्या २७७ जागा निवडून येतील – अमोल मिटकरी
‘कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य नाही, तर फाळणी दिली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

