🕒 1 min read
औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीसाठी (एनडीए) घेण्यात येणारी प्रवेशपूर्व परीक्षा १४ नोव्हेंबर हाेणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात परीक्षा केंद्र मिळाल्याने मराठवाड्यातील तरुणांची माेठी साेय झाली आहे. परीक्षेचे अर्ज दाखल करण्याची मुदत २९ जून आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ७५ परीक्षा केंद्रे वाढवली आहेत. महाराष्ट्रात चार शहरात नवीन परीक्षा केंद्रे घोषित केली आहेत.
यापूर्वी मुंबई आणि नागपूर येेथे परीक्षा देण्याची सोय होती. देशभरातून या परीक्षेला सहा लाखांवर विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. पुणे, खडकवासला आणि नेव्हल अकादमीसाठी वर्षातून दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोग लेखी वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेते. प्रथम लेखी परीक्षा व त्यानंतर पाच दिवसांचा मुलाखत व शारीरिक चाचणीचा कार्यक्रम असतो. यातून साडेतीनशे यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीत तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. कोरोनामुळे सर्वच परीक्षांवर परिणाम झाले आहे.
यावर्षीची पहिली प्रवेशपूर्व परीक्षा १८ एप्रिल रोजी पार पडली. दुसरी परीक्षा ५ सप्टेंबरला हाेणार हाेती. मात्र, बारावी परीक्षेचे निकाल अद्याप लागलेले नसल्यामुळे परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचे निश्चित केले आहे. राज्यात मुंबई, नागपूरसह अाता नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबादला परीक्षा केंद्र असेल. पूर्वी औरंगाबाद शहरातील राज्य शासनाच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा नागपूरला न्यावे लागत होते. संस्थेने भारतीय सैन्याला सहाशेवर अधिकारी दिले असून यापैकी १२० फायटर पायलट आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत अनेक भागांमध्ये आठव्या दिवशीही निर्जळी, मनपाचे पाणीपुरवठा अधिकारी ‘आऊट ऑफ रिच’!
- ‘या’ कारणामुळे आणीबाणीवर संघ आणि भाजपाने बोलूच नये; काँग्रेसचा पलटवार
- गंभीर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ७७६ डॉक्टरांनी गमावला जीव
- ‘काही जणांची CBI चौकशीची मागणी केल्यावर संजय राऊतांच्या छातीत कळ का आली ?’
- मराठवाड्यातील मराठा समाजाला ‘मराठा कुणबी’ प्रमाणपत्र द्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
