🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय संघाने गेल्या 7 वेळा दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीवर पराभूत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यात भारतीय संघाला अजूनही यश मिळवता आले नाही. भारतीय दिग्गज सुनील गावस्कर (sunil gavskar) यांच्या मते आगामी दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या भूमीवर पराभूत करण्याची भारताकडे सुवर्णसंधी आहे. विराट कोहलीचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला तर तो सर्वकाही साध्य करेल. असही गावस्कर म्हणाले आहेत.
स्पोर्टस्टारच्या एका स्तंभात, भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांनी लिहिले, “जर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत जिंकला तर ती खरोखर अभिमानाची गोष्ट असेल आणि भारत सर्व कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे चक्र पूर्ण करेल. दक्षिण आफ्रिका हा शेवटचा अडथळा आहे.
भाताने दक्षिण आफ्रिकेत एकूण 20 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त तीनच सामने त्यांनी जिंकले आहेत. संघाने 10 सामने गमावले असून 7 सामने अनिर्णित राखण्यात यश आले आहे.
2018 मध्ये भारतीय संघाला 2-1 ने मालिका गमवावी लागली होती.गावसकर यांना या वेळी परिस्थिती वेगळी आहे असे वाटते. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे.दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची भारताकडे सर्वोत्तम संधी आहे,
गावस्कर पुढे म्हणाले, ‘भारतीय गोलंदाजी आवडणाऱ्या क्विंटन डी कॉकबद्दल चर्चा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आफ्रिकेची फलंदाजीची फळी थोडी कमकुवत दिसत आहे. त्यामुळे भारताला मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही; कारण..’
- “पडळकरांनी अजितदादांवर केलेले आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने…”
- वाजपेयीजींना विसरून चोर दाराने उद्योग करायचा असेल तर ते योग्य नाही- नवाब मलिक
- “राज्य विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का?”,पडळकरांच्या टीकेवर मिटकरींचे प्रत्युत्तर
- आपल्या कृषीप्रधान भारतीय समाजाचा पाया म्हणजे अन्नदाता शेतकरी- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
