🕒 1 min read
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (३ मार्च) पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. राज्यपाल अभिभाषणवेळी मविआ नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आपलं अभिभाषण पटलावर ठेवत भाषण न करताच ते निघून गेले. यावरूनच महिला व बालविकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी टीका केली आहे.
“राज्यपालांनी आपल्या घटनात्मक जबाबदारीचं वहन करायचं टाळलंय. त्यांनी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण आहे. माननीय राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. राष्ट्रपतींनी याची गंभीर दखल घेऊन राज्यपालांना परत बोलवलं पाहिजे.”, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
राज्यपालांना परत बोलवलं पाहिजे. राज्यपाल जाणीवपूर्वक राजकारण करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. खरं तर त्यांना राज्याच्या विकासाचा आढावा मांडणारं भाषण करायचंच नव्हतं असं दिसतंय. राज्य सरकारची उपलब्धी सांगायची नव्हती. भाजपचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतायत
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) March 3, 2022
तसेच राज्यपाल जाणीवपूर्वक राजकारण करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. खरं तर त्यांना राज्याच्या विकासाचा आढावा मांडणारं भाषण करायचंच नव्हतं असं दिसतंय. राज्य सरकारची उपलब्धी सांगायची नव्हती. भाजपचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतायत. असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
State Budget Session 2022 : यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल- अजित पवार
-
IPL 2022: आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नईला मोठा झटका ; दीपक चहर दुखापतीमुळे होऊ शकतो बाहेर
-
State Budget Session 2022 : भाषण न करताच राज्यपाल कोश्यारी निघून गेले; काय होते कारण?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
