Share

State Budget Session 2022 : भाषण न करताच राज्यपाल कोश्यारी निघून गेले; काय होते कारण?

Published On: 

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल कोश्यारी मविआ सरकारकडून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण पटलावर ठेवत भाषण न करताच ते निघून गेले. (Governor Koshyari left without speaking) तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात ठराव आणणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विधान भवनाच्या पायरीवरच आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात पोहचले आहेत. तर राज्यपाल अभिभाषण वेळी सत्ताधारी पक्षाची लोक गोंधळ घालत होती. सत्ताधारी पक्षाची ही जबादारी होती की, सभागृहाचे वातावरण चांगले ठेवणे. यातही ठाकरे सरकार फेल ठरले असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!