🕒 1 min read
मुंबई : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल महाविकास आघाडीने राज्यपालांना सकाळी ११ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडीचा अंतिम निर्णय कळवा अन्यथा निवडणूक घेण्यात येईल, असा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंद लिफाफ्यात एक पत्र दिले आणि महाविकास आघाडीने नरमाईची भूमिका घेत हि निवड पुढे ढकलली. या पत्रात राज्यपालांनी काय लिहीले होते याची माहिती मात्र समजू शकली नाही.
काल विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते तयारीत होते. मात्र राज्यपालांनी ही निवडणूक गुप्त मतदानाद्वारेच करण्याचा निर्णय दिला होता, तर महाविकास आघाडी सरकार आवाजी मतदानावर ठाम होते.
राज्यपालांच्या पत्रानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवड पुढे ढकलल्याची माहिती दिली. तसेच महामहिम राज्यपाल ही पण एक महत्त्वाची व्यक्ती आहे, त्यांचाही आदर ठेवला पाहिजे. अशी आमची सगळ्यांची भावना होती, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
आता २९ फेब्रुवारीला नागपुरात अधिवेशन घ्यायचे ठरले आहे. या मधल्या काळात याबाबत शंका-कुशंका राहणार नाहीत, बहुमताच्या जोरावर आम्ही कोणत्याही गोष्टी रेटू शकलो असतो, पण घटनेची कुठेही पायमल्ली झाली नाही पाहिजे, हे आम्हा तिन्ही पक्षांचं मत आहे, आम्ही प्रमुख लोक राज्यपालांची पुन्हा भेट घेणार आहोत, पुन्हा पारदर्शी चर्चा होईल, अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुणावर हल्ला घडवून आणण्याची वृत्ती वाळव्याच्या पाटलांची नाही’, राऊतांकडून जयंत पाटलांची पाठराखण
- “भाजप पुढाऱ्यांच्या डोक्याचा केमिकल लोचा”, संजय राऊतांची खोचक टीका
- नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; आज होणार पुन्हा सुनावणी
- ‘…याने विद्यापीठाचा सत्यानाश होईल, तुमच्या PA कडे रांगा लागतील’, चित्रा वाघ यांचा घणाघात
- 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परिक्षा पुन्हा पुढे ढकलली; पुढील तारीख लवकरच होणार जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

