Bhagatsingh Koshyari | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना पदावरुन तातडीने हटवण्याची मागणी होत आहे. असातच राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी त्यांना स्वतःलाच पद नको असल्याचं त्यांनी त्यांच्या निकटवर्तियांना सांगितलं असल्याचं समोर आलं आहे.
भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती समोर येतं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
मुंबईतून गुजरातींचा पैसा काढून घेतला तर काही उतरणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत नुकतंच केलेलं वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखवल्या गेल्या. यानंतर अनेकांनी राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवरायांची तुलना शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्याशी केल्यानंतर यावेळी महाविकास आघाडी राज्यपालांविरोधात आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारमधील भाजपने यावर तत्काळ भूमिका घेऊन, महाराष्ट्रातून या राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jitendra Awhad | “माविआला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक द्यावीच लागेल”; राज्यापालांच्या विधानावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक
- Ajit Pawar | “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत म्हणतात की…”, अजित पवारांचा गौप्यस्फोट
- Raj Thackeray | धोतर असा उल्लेख करत राज ठाकरेंचा राज्यपाल कोश्यारींवर निशाणा
- Health Tips | कोरड्या खोकल्यापासून त्रस्त आहात?, तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Sushma Andhare | “प्रिय नितू, माझ्या बाबांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू…”, सुषमा अंधारेंचा नितेश राणेंवर घणाघात


