मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून चिघळत असलेलं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात रोज वेगवेगळे वळण बघायला मिळत आहेत. अशातच एसटी महामंडळाकडून संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या, २४ तासांच्या आत कामावर रुजू व्हा अन्यथा कामावरून कामी करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटीसा कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप थांबवण्यासाठी त्याच सोबत या संपातून मार्ग काढण्यासाठी या संपामध्ये फूट कशी पडेल. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण कसं निर्माण होईल. कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीसा देणं आणि सेवा समाप्तीच्या धमक्या देणं, असले प्रकार राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे आम्ही राज्याचे पालक म्हणून राज्यपालांना भेटलो, असं भाजपा नेते गोपिचंद पडळकर म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत गोपीचंद पडळकर, सदभाऊ खोट व इतर नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विनंती केली आहे की, परिवहन मंत्री आणि परिवहन सचिव यांच्याकडून माहिती द्या. कशाप्रकारची आणि काय कामं चालू आहेत. यांची माहिती घ्या, इतके दिवस काम चालू असताना हे सरकार काय काम करत आहे, अशा प्रकारची मागणी केल्याचं गोपिचंद पडळकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- कंगनाच्या वक्तव्यावर सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
- ‘धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते’
- उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यावर टीका
- एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटिस; २४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा…
- ‘विस्कळीत विचारांच्या अवाढव्य हिंदुत्वाला बाळासाहेबांनी वास्तूचे रूप दिले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

