🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे. त्यात आता बहुजन बांधवांनाही नियुक्त्या देण्याची मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. मात्र, ही मागणी करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. ही बाब तुमच्या अधिकारातली असल्याचेही पडळकर यांनी म्हटले आहे.
या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये मराठा समाजाबरोबरच भटके विमुक्त, अनुसुचीत जाती व जमाती यांचीही भरती प्रक्रिया रखडली आहे. त्या सर्वांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर पाल्य आदित्य ठाकरेला जसे मंत्रीपदाचे नियुक्ती पत्र दिले, तसे बहुजन बांधवांनाही नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.
मा.मु. उद्धवजी ज्याप्रमाणे आपण #मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर लगेचच आपल्या पाल्याला श्री आदित्य #मंत्रीपदी नियुक्ती दिली, त्याचं तत्परतेनं #बहुजन बांधवांनाही नियुक्त्या द्याव्यात आणि ही बाब तुमच्याच अधिकारातली.. उगा आता पंतप्रधानांना हात जोडू नका.#MarathaReservation #MPSC pic.twitter.com/pu5fgSK4mq
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) May 9, 2021
या संदर्भात पडळकर यांनी सोशल मीडियावर मागणीचे पत्र शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘उद्धवजी ज्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर लगेचच आपल्या पाल्याला आदित्य यांना मंत्रीपदी नियुक्ती दिली, त्याचं तत्परतेनं बहुजन बांधवांनाही नियुक्त्या द्याव्यात आणि ही बाब तुमच्याच अधिकारातली.. उगा आता पंतप्रधानांना हात जोडू नका.’
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : आंदोलनाची भूमिका आश्चर्यकारक असून, हे केवळ राजकारण सुरू आहे – चव्हाण
- ‘योग्य कोण? तुम्ही की पंतप्रधान मोदी?’, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
- मराठा आरक्षणाच्या विषयावर कोणीही राजकारण न करता एकदिलाने काम करावे : शिंदे
- ‘बंगाल जिंकण्याच्या आग्रहामुळे देश उद्ध्वस्त’, ममतांचा मोदींवर हल्लाबोल
- ऑक्सिजन निर्मितीबाबत नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दिशाभूल सुरु आहे – गावीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
