🕒 1 min read
औरंगाबाद : आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग दूर करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लसीकरण करण्यासाठी तीन टप्प्यात लस उपलब्ध झाल्या आहेत. मार्च महिन्यानंतर ५० वर्षावरील वरील लोकांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक स्वप्नील लाळे यांनी दिली.
हळूहळू कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र आता लस उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. पोलिस कर्मचारी, आरोग्य विभागाशी संबंधित कोरोनात काम केलेल्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय मार्च महिन्यानंतर ५० वयोगटाच्या वरील लोकांना लस दिली जाणार आहे. त्यात को व्हॅक्सिन, कोव्हीड सीड या दोन्ही लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात २ हजार को-व्हॅक्सिंन तर ६४ हजार कोव्हीड सीड उपलब्ध झाल्या.
याशिवाय दुसऱ्या टप्प्यात को-व्हॅक्सिंन १ हजार ४०० तर कोव्हीड सीड ५४ हजार उपलब्ध झाल्या आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यावर भर दिला जात आहेत. तीन टप्प्यात सध्या लस देण्याची तयारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देखील सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. मास्क लावणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, स्वतः ची काळजी घेऊनच सर्वांनी घराबाहेर पडावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! मामाचा तेरा वर्षीय भाचीवर अत्याचार
- मनपाने वीजबील थकवल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्याची भिती
- #shweta : चावट गप्पा मारणारी श्वेता आहे तरी कोण ? सोशल मीडियावर नेटिझन्सचा धुमाकूळ
- भिकाऱ्यांचा कायापालट करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी
- ‘संजय राठोड दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

