Share

भिकाऱ्यांचा कायापालट करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शिवजयंती निमित्त औरंगाबाद येथील सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपतर्फे शुक्रवारी(दि.१९) औरंगाबाद शहरात आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रथम क्रांती चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या अभिनव उपक्रमास सुरुवात करण्यात आली. शहरातील भिकाऱ्यांना स्वच्छ, टापटीप करुन जंटलमन बनवत शिवरायांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली.

गरीब निराधार मनोरुग्णांसाठी माणुसकी धर्म अजूनही जिवंत आहे हे समाजसेवक सुमित पंडित यांनी आज पुन्हा एकदा दाखवुन दिले. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पर्वावर भिकाऱ्यांना जंटलमन बनवण्याचा ध्यास मनी घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला. दरवर्षी शिवजयंतीस वेगवेगळ्या ठिकाणी सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हे कार्य करते. आज सकाळी सहा वाजता रेल्वे स्टेशन, बस स्टँड परिसर या भागात असणाऱ्या बेवारस निराधारांना एकत्र करण्यात आले.

त्यांना जमा करून प्रथम त्यांची दाढी कटिंग करण्यात आली. त्यानंतर त्यांची आंघोळ करून परिधान करण्यासाठी नवीन कपडे देण्यात आले. नवीन कपडे मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसूच आमचे समाधान असल्याची भावना माणूसकी समुहातील सदस्यांनी व्यक्त केली. यावेळी स.पोलिस निरक्षक संजय बनसोडे, विशाल टिंप्रवार, भरत कल्याणकार, ज्यूनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने, पुजा पंडीत उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!