Share

‘रोहित पवार निवडून आले तर कोणी बिनलग्नाचं राहणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- ग्रामीण भागात युवकांचे लग्न होत नाहीत, मात्र आता रोहितदादामुळे कोणाचंही लग्न राहणार नाही, असे वक्तव्य राज्यात छोटा पुढारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीगोंदे तालुक्यातील घनश्याम दराडे याने केले आहे. यानंतर सभामंडपात एकच हशा पिकला. कर्जत तालुक्यातील मांळगी येथे रोहित पवार यांच्या सृजन संस्था व मित्रमंडळाच्या माध्यमातून युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना तो पुढे म्हणाला, तरुणांच्या हाताला काम नक्की मिळणार हे रोहितदादा पवार यांचे वादळ कर्जत व जामखेड तालुक्यात आल्याचंही छोट्या पुढाऱ्याने यावेळी नमूद केले. याच सभेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, हे छोटे पुढारी नसून छोटे कलेक्टर आहेत आणि त्यांच्या भाषणामुळे फेमस आहेत आणि सिनेक्षेत्रात प्रसिद्ध आहेत ते कष्ठामुळे आणि हाच आदर्श युवकांनी समोर ठेवावा, प्रामाणिकपणे काम करताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये व युवकांमध्ये जाऊन काम करण्यास आवडते आणि मी जिंकण्यासाठीच निवडणुकीत उतरलो आहे असे ही ते यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यातर्फे आयोजित युवा महोत्सवाचा एकच चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसचे जागावाटप अंतिम टप्प्यात आलेले असताना रोहित पवार यांची कर्जत- जामखेड मधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!