🕒 1 min read
मुंबई : काळानुसार शेतीचे स्वरुप बदलत असताना दिसत आहे. पाणीटंचाई भासू नये म्हणून शेतकरी शेततळे बांधत असतात. शेततळ्याची उभारणी केल्यानंतर मत्स्यशेतीसाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. शेततळ्याचा वापर मस्त्य शेतीसाठी करता येतो. व यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील मिळतो. मत्स्य व्यवसायाची सुरवात कशी करावी पाहूया सविस्तर..
मत्स्यपालन गोड्या पाण्यातील शेततळ्यामध्ये केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने कटला, रोहू, मृगळ या भारतीय प्रमुख कार्य माशांचे चंदेरा, गवत्या, सायनस या माशांचा संवर्धनासाठी उपयोग केला जातो. खत व्यवस्थापनानंतरच मत्स्य संवर्धन तुम्ही करू शकता. या प्रक्रियेनंतर 15 दिवसांनी तलावात मत्स्य संवर्धन करू शकता. यासाठी साधारण 10 से.मी आकाराचे छोटे मासे प्रति हेक्टरी 5 हजार याप्रमाणे संवर्धनासाठी तलावात सोडा. तसेच 3 ते 4 किंवा 6 प्रकारच्या माश्यांचे एकत्र संवर्धन सुद्धा करता येईल .
मत्स्यपालनाचा फायदा –
मत्स्यसंवर्धनाचा काळ हा 10 महिन्याचा असतो. दरम्यानच्या कालावधीत योग्य जोपासणा झाली तर माशाची वाढ ही 1 किलोपेक्षा अधिक होते. यामध्ये सर्वाध महत्वाची बाब म्हणजे शेततळ्यामध्ये बारमाही पाणी असणे गरजेचे असते. एवढेच नाही मत्स्यबीज हे चांगल्या दर्जाचे असणे गरजेचे आहे. सर्वकाही नियोजनबध्द झाले तर वर्षभराचा कालावधीत भरपूर नफा कमावता येतो. या व्यवसयामुळे शेततळ्यात पाणी कसे राहिल याची काळजी घेतली जाते त्यामुळे बारमाही शेततळ्यात पाणीही ठेवता येते.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
