मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा क्रिकेटशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडण्यासाठी ओळखला जातो. कोणत्याही तर्काशिवाय सरळ शब्दात केलेल्या विधानांमुळे गंभीर अनेकदा वादात सापडला आहे. आता त्याने विराट किंवा धोनी हे दोघेही त्याचे आवडीचे कर्णधार नसल्याचे सांगत एका दुसऱ्या खेळाडूचे नाव घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी गौतम गंभीरने (gautam gambhir) त्याची सर्वकालीन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली होती. यामध्ये त्याने टीम इंडियाच्या सर्व महान खेळाडूंना स्थान दिले आहे. पण यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंभीरने या प्लेइंग इलेव्हनचे कर्णधारपद सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni), विराट कोहली (Virat kohli) आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) यांना दिलेला नाही. गौतम गंभीरच्या मते अनिल कुंबळे हा भारताचा सर्वोत्तम कर्णधार आहे. कुंबळेला आपला आवडता कर्णधार असल्याचे सांगताना गंभीर म्हणाला “जर अनिल कुंबळेला धोनी आणि कोहलीप्रमाणे दीर्घकाळ कर्णधारपदाची संधी मिळाली असती, तर भारताला ही कामगिरी करता आली असती. कुंबळे मुळेच टीम इंडिया टेस्टमध्ये नंबर १ टीम बनू शकली.”
टीम इंडियाच्या इतिहासात अनिल कुंबळे आजपर्यंतचा सर्वात मोठा सामना विजेता ठरला आहे. आपल्या फिरकीच्या जोरावर त्याने अनेक संस्मरणीय विजय भारताच्या नावे केले आहेत. भारताकडून कसोटी फॉरमॅटमध्ये ६१९ विकेट घेण्याचा विक्रमही अनिल कुंबळेच्या नावावर आहे, एवढेच नाही तर एका डावात १० विकेट घेण्याचा पराक्रमही कुंबळेने केला आहे. तसेच त्याने १४ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपदही भूषवले होते, ज्यात भारतीय संघ टेस्ट मध्ये नंबर १ ठरला होता.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या शत्रूंनी शिवचरित्रातील ‘हा’ धडा घ्यावा- संजय राऊत
- VIDEO : “घरी कसं काय…सगळं बरंय?”, रोहितनं अर्जुन तेंडुलकरशी मराठीतून साधला संवाद!
- “लोकांना तुझा खेळ लक्षात आहे”; शोएब अख्तरने दिला शेन वॉर्नच्या आठवणींना उजाळा
- भाजपवाले कधीपासून हिंदू झालेत हे पाहावं लागेल- संजय राऊत
- सुशासन आणि लोकांची सेवा काय देते?; फडणवीसांकडून मोदींचे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

