मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ईडीने सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर कारवाईचा बडगा उठवला आहे. या कारवाईमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक आदींचा समावेश आहे. या कारवाईवरुन सत्ताधारी नेत्यांकडूनही अनेक टीकात्मक वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये ईडीच्या कारवाईवरुन टीका केली आहे.
‘महाराष्ट्रात इतक्या वर्षांत इतक्या ईडीच्या केसेस कधी ऐकल्या आहेत का तुम्ही? खडसे, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक अशा अनेक जणांच्या विरोधात केसेस आहेत. हल्ली विरोधकांना त्रास देण्यासाठी याचा साधन म्हणून वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठीक आहे. काही काळ येतो, नंतर जातो. जेव्हा हा काळ जाईल, तेव्हा यात दुरुस्त्या होतील,’ असं म्हणत शरद पावर यांनी केंद्र सरकारसह भाजपवर निशाणा साधला.
आता भाजपने पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात एकाचवेळी ‘ईडी’च्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? पूर्वीच्याकाळी भानगडी करणारेच सरकारमध्ये असतील तरकशाला ईडी कारवाई करेल? बिनदिक्कत सुरू होत कारण सैयां भये कोतवाल, अब डर काहे का? आता परिस्थिती बदलली त्यामुळे कारवाया होत आहेत,’ असं भाष्य भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बेळगावात मराठी माणूस हरला नसून शिवसेना हरली आहे’, भाजपचा टोला
- देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांना सोबत प्रयत्न करावे लागतील – सरसंघचालक
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
- ‘मोहन भागवत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले..’
- ईडीने हस्तक्षेप करणं एका अर्थानं राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणं; शरद पवारांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
