Share

‘बेळगावात मराठी माणूस हरला नसून शिवसेना हरली आहे’, भाजपचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बेळगावात पुन्हा एकदा भाजपने कमळ फुलवित पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला . यावरूनच मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, अशा शब्दात बेळगावच्या भाजपच्या विजयावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. तर यावरूनच भाजपचे अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.

‘मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, अशा शब्दात बेळगावच्या भाजपच्या विजयावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र बेळगावात मराठी माणूस हरला नसून शिवसेना हरली आहे. भाजपचे किमान १५ मराठी उमेदवार जिंकले आहेत. ही फशिवसेना असल्याचे मराठी माणसाच्या लक्षात आले आहे.’ असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एवढ्या वर्षांपासून तिथे प्रशासक नेमला होता. पण अचानक तिथे निवडणूक घेण्यात आली. प्रचाराला वेळ मिळू दिला नाही. हे सर्व प्रकरण पाहिल्यावर हा पराभव घडला हे दुर्दैव असलं, तरी कर्नाटकचं सरकार सीमाबांधवांचा आवाज कोणत्या पद्धतीने दडपतंय हे पाहिलं की अंगावर काटा उभा राहतो. तरीही आमचे लोक तिथे संघर्ष करतात, लाठ्या खातायत,तुरुंगात जाताय. त्याचं कौतुक करायला हवं. तर तुम्ही पेढे वाटताय? असा खोचक टोला राऊत यांनी लगावला होता. यावरच भाजपचे अतुल भातखळकर यांनी प्रतिउत्तर देत राऊत यांना सुनावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!