Share

यापुढे सातबारा उतारा बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड ठेवणार; राज्य शासनाचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील जे शहर सिटी सर्व्हेमध्ये लागले त्या शहरात जमीनीचा सातबारा उतारा अजुनही सुरु आहे. या शहरात शेतजमीनच शिल्लक राहिली नसल्याने सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता शहरातील शेतजमीनींचा सातबारा उतारा बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरु ठेवण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे.

सातबाऱ्यांचं प्रॉपर्टी कार्डमध्ये रुपांतर होऊनही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सातबारा कायम ठेवला जातो. त्यामुळे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे सर्व शहरांतील सातबारा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याची सुरुवात पुण्यातील हवेली तालुक्यासह सांगली, मिरज, नाशिकमधून होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबवण्यात येईल. सिटी सर्व्हे झाल्यास सातबारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणं आवश्यक आहे. तरीसुद्धा सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहेत. सिटी सर्व्हे झाला. पण सातबारा उतारा नाही, अशाही काही जमिनी आहेत. यामुळे फसवणुकीचे प्रकार वाढले असून न्यायालयात खटल्यांची संख्याही वाढत आहे. यामुळे भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!