Share

पक्षस्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी राणेंच्या पक्षाने उधळला गुलाल

Published On: 

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने तालुक्यात पाच ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच करत जिल्ह्यामध्ये खाते उघडले आहे. कॉंग्रेसला राम राम ठोकल्यानंतर नारायण राणे यांनी काल नव्या पक्षाची घोषणा केली आणि आज हा विजय मिळवत पक्षाने राजकीय घोडदौडीचा श्रीगणेशा केला आहे .

महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाची घोषणा केल्यानंतर राणेंच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ‘समर्थ विकास पॅनल’च्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात पाच ग्रामपंचायतीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने खाते उघडले आहे. तालुक्यातील 52 पैकी 50 ग्रामपंचायतीत समर्थ विकास पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभे केले होते. त्यातील नेतर्डे, कवठणी, तळवणे, कलंबिस्त, वेर्ले आदी पाच ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच निवडले गेले आहेत .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!