Share

…म्हणून एसटी संप चिघळला; माजी मंत्र्याचा राज्यसरकारवर आरोप

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू आहे. वेतनवाढ केली असली तरी आंदोलक विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामावर आलात तरच वेतन दिले जाईल, असा इशारा देखील दिला आहे त्यामुळे कर्मचारी पुन्हा कामावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत.

भाजप व शिवसेना युतीच्या काळात जलसंपदा मंत्री राहिलेले गिरीश महाजन यांनी एसटी कामगारांच्या आंदोलनावरून राज्य सरकारवर आरोप केले आहेत. गिरीश महाजन यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची अचानक भेट घेतली. अण्णा हजारे यांच्या तब्येतीची चौकशी करत त्यांच्या सोबत अनेक विषयांवर चर्चा देखील केली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी मध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना हे आंदोलन का चिघळत आहे यावर भाष्य केलं.

मध्यमांशी संवाद साधत असताना गिरीश महाजन म्हणाले, राज्यात महिनाभरापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सरकारला मिटवता येत नाही, हे सरकारचे अपयश आहे. भाजप-शिवसेनेचे सरकार असताना मराठा क्रांती मोर्चाची आरक्षणासाठीची आंदोलने, ओबीसींची आरक्षणासाठी आंदोलने, नाशिकहून निघालेला शेतकरी मोर्चा अशी अनेक आंदोलने झाली. मात्र, त्या त्यावेळी आम्ही सरकार म्हणून आंदोलकांशी संवाद साधत होतो. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आंदोलकांशी काही देणेघेणे नाही, अशा पद्धतीने वागत आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!