Share

Sanjay Raut : “…अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा”, संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे. हा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला असून यावर अद्याप सुनावणी होणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना आपला स्वतंत्र संसार मांडा, असा सल्ला दिला आहे.

“शिवसेना सोडली म्हणल्यावर आता अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा. बंडामुळे पक्षाला काही एक फरक पडणार नाही. शिवसेना-शिवसेना करण्यापेक्षा पक्षाची स्थापना करून मतदारांपुढे जा , म्हणजे अस्तित्व लक्षात येईल. ही बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे आणि भविष्यातही राहिल.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानाचा मुद्दा घेऊन बंड केलेल्यांकडे आता स्वाभिमान दाखवून द्यायची संधी आहे. आता शिवसेनेच्या पंखाखाली राहून आपला स्वाभिमान जपू नये.  अनेकांनी पक्ष सोडूनही शिवसेना नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस उजाडत नाही त्यांना स्वत:चा स्वाभिमान दाखवून द्यावा. असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!