मुंबई: माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ओबीसींच्या लोकसंख्येबाबत आक्षेप असल्यास परत सर्वेक्षण करण्याची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. तसेच आरक्षणावरून विरोधकांच्या टीकेलाही फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“ज्यांना ओबीसी आरक्षण द्यायचे नाही, ते आता बुद्धीभेद करीत आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणात अडथळे आणण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यांनी बांठिया आयोग नेमला, तेच आता त्यावर आक्षेप घेत आहेत. यासंदर्भात अन्य कुठलाही अभ्यास करायचा असेल तर आमचे सरकार त्यासाठी तयार आहे.”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
➡️ ज्यांना ओबीसी आरक्षण द्यायचे नाही, ते आता बुद्धीभेद करीत आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणात अडथळे आणण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यांनी बांठिया आयोग नेमला, तेच आता त्यावर आक्षेप घेत आहेत. यासंदर्भात अन्य कुठलाही अभ्यास करायचा असेल तर आमचे सरकार त्यासाठी तयार आहे. @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 15, 2022
दरम्यान बांठिया आयोगाने राज्यात ओबीसींची लोकसंख्या ३७ टक्के असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणानंतर काढला असून हा अहवाल राज्य सरकारने फेटाळून लावावा, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. दरम्यान बांठिया आयोगाचा अहवाल ओबीसींच्या राजकीय आरक्षणापुरता असून त्यांना २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याची शिफारस आयोगाने केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “आमदार-खासदार फोडून सरकारे बनविली…”, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा
- Sanjay Raut : “हुकूमशहा हा एक डरपोक माणूस…”, असंसदीय शब्दांच्या यादीवरुन संजय राऊतांचा टोला
- Sanjay Raut : भाजपला ऐतिहासिक शब्दांचे भाले का टोचावेत?; ‘त्या’ नियमावरून शिवसेनेची टीका
- T20 World Cup 2022 : शेवटच्या क्षणी ‘या’ दोन संघांनी मिळवले टी-२० विश्वचषकात स्थान
- Sharad Pawar : “…तर मी नवीन सरकारचे अभिनंदन केले असते”, शरद पवारांचे वक्तव्य


