औरंगाबाद : लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राची मने जिकणारे प्रसिद्ध लोककलावंत निरंजन भाकरे यांचे निधन झाले आहे. ‘बुरगुंडा’ या भारुडाने त्यांनी देशच नाही तर विदेशातही कार्यक्रम गाजवले होते. अनेक वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
निरंजन भाकरे यांचा जन्म १० जून १९६५ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे झाला होता. भाकरे यांनी लोककला आणि भारुडांच्या माध्यमातुन अख्ख्या महाराष्ट्राची मने जिंकली होती. सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा, दम दमा दम, ट्रिक्स मिक्स रिमिक्स, धिना धिन धा, तसेच झी मराठी वरील मराठी पाऊल पडते पुढे, अवघा रंग एक झाला, महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र माझा अशा अनेक कार्यक्रमांत त्यांनी रसिकांच्या मनात घर केले होते.
भाकरे यांनी सपत्निक देहदानाचा संकल्प केला होता. राज्य सरकारच्या वतीने सर्व सामान्यांसाठी असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून केले. लोककला जीवंत ठेवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मोठे आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची टंचाई, मात्र ५०० ऑक्सिजन बेड रिकामे!
- मराठा आंदोलनाला मोठे यश, ‘या’ चार मागण्या झाल्या मान्य!
- ‘आता लस देताना मोदी रडतायत; जुमलेबाजीवर सरकार टिकत नाही, सत्ताजीवी भाजपने लक्षात ठेवावं’
- प्रशासनाची काॅन्टॅक्ट हिस्ट्री तपासणीकडे डाेळेझाक; उस्मानाबादेत काेराेना स्प्रेडर फिरताहेत खुलेआम
- ‘भाजप नेते लोकांच्या मृतदेहावर उभे राहून पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
