🕒 1 min read
नवी दिल्ली : बिहार निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरत खासदार राहुल गांधी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भारतात पहिल्यांदाच आर्थिक मंदी आली असल्याचे राहुल गांधी यांनी गुरुवारी ट्विट करत म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची शक्ती कमकुवत केली आहे, असे टीकास्त्रही राहुल गांधी यांनी सोडले आहे.
राहुल गांधी यांनी यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीचाही दाखला दिला आहे. जुलै ते डिसेंबर या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी आहा ८.६ टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.
India has entered into recession for the first time in history.
Mr Modi’s actions have turned India’s strength into its weakness. pic.twitter.com/Y10gzUCzMO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 12, 2020
रिझर्व्ह बँकेकडून काही दिवसांपूर्वी बुधवारी यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये जुलै-डिसेंबर या तिमाहीत भारताचा विकासदर 8.6 टक्क्यांपेक्षा खाली राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. कोरोना संकटामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत उणे विकासदर नोंदवला गेला होता. त्यामुळे देश मंदीच्या फेऱ्यात अडकल्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत जीएसटी परताव्यात झाली १० टक्क्यांची वाढ’ – अर्थमंत्री निर्मला सीतारामन
- शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, भाजपा करणार चुन भाकर आंदोलन
- तैमूर लवकरच होणार मोठा भाऊ, सैफिनाच्या घरी येतोय छोटा पाहुणा!
- मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत प्रयत्न करणार – जयंत पाटील
- ‘मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ, पण…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

