🕒 1 min read
नांदेड: जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील नायगाव येथील महिलांच्या लढ्याला यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर त्यानी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे येत्या २ मार्च रोजी होणाऱ्या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव घेण्याचा निर्णय झाला आहे. मंगळवारी सरपंच नागेंद्र सूर्यकार व ग्रामसेवक जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांच्या पार पडलेल्या मासिक बैठकीत हा निर्णय झाला. यासाठी २ मार्च रोजी ग्रामसभा घेण्याचे ठरवण्यात आले.
गावातील सरपंच, उपसरपंच निवड ही पोलिस बंदोबस्तात पार पाडावी लागली होती. कारण गावातील महिलाची आधि दारुबंदी मग सरपंच असा निर्धार घेतला आणि ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत सदस्यांना पोलिस बंदोबस्तात थेट सभागृहातच आणण्यात आले होते. या प्रकारामुळे महिलांना संताप अनावर झाला होता. त्यांनी याचा निषेधही केला होता. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही निवड प्रक्रिया पार पडली होती.
धर्माबाद तालुक्यातील नायगाव दारूबंदीसाठी आक्रमक झालेल्या महिलांमुळे सर्वत्र परिचित झाले होते. गावातील असलेल्या दारूच्या दुकानामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मोठ्यांसोबत लहान मुलेही दारू पित असल्याने महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते. दरम्यान, ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले होते. त्यावेळी सरपंच, उपसरपंच यांची निवड होणे बाकी होते. त्यामुळे या कार्यवाहीला वेळ लागला.
महत्वाच्या बातम्या
- लातूर पोलिसांकडून बुलेटचा आवाज चिरडला; धडक कारवाई
- मुलांनाे, आई-बाबांनी बाहेर जाताना मास्क घातला की नाही ते पाहा; आरोग्य मंत्र्यांचे शाळकरी मुलांना पत्र
- भीषण अपघातात सुधीर मुनगंटीवार यांचे चुलत बहीण-भाऊजी ठार
- खासदार इम्तियाज जलील हे चंद्रकांत खैरे यांचे चेले- हर्षवर्धन जाधव
- पुण्यात आजही कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
