Share

मराठा आरक्षणाचा लढा तीव्र; ७ मार्च रोजी राज्यस्तरीय आक्रोश मोर्चाची तयारी सुरू

Published On: 

🕒 1 min read

जालना : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या ३५ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आता आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून ७ मार्च रोजी राज्यस्तरीय आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी साष्टपिंपळगाव येथे येऊन आंदोलकांची भेट घेतली होती. मात्र त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता.

राष्टपिंपळगावातील आंदोलनाला राज्यभरातील विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील गावागावांमध्ये उपोषणे केली जात आहेत. अंबड तालुक्यातही प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर देखील मराठा आरक्षणासाठी आंदोलने करण्यात आली.

दरम्यान, आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून राष्टपिंपळगाव येथे ७ मार्च रोजी राज्यस्तरीय आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. मराठा समाजाने आपल्या व मुलांच्या भविष्यासाठी आरक्षणाच्या या लढाईत एकजूट दाखवण्याचे आवाहन साष्टपिंपळगावातील आंदोलकांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!