जालना : लॉकडाऊनसारखी कठीण परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तरी शेतकऱ्यांना अडचणी येऊ देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी सभापती अर्जून खोतकर यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
कोरोनामुळे गेल्या वर्षी संपर्ण देशासह जगभरात भितीचे वातावरण होते. अशा परिस्थितीतही आपण केलेल्या आवाहनानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन शेतमाल खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरू ठेवली. त्यामुळेच कठीण काळातही शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे मिळाले. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. त्यामुळं लॉकडाऊनसारखी कठीण परिस्थिती पुन्हा निर्माण झाली, तरी शेतकऱ्यांना अडचणी येऊ देणार नाही, अशी ग्वाही सभापती अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.
पुढे बोलताना खोतकर म्हणाले, सध्या कोविडचा संसर्ग हा गुणाकार पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात देखील कोविडचे रुग्ण वाढत आहेत. लस जरी आली असली तरीही कोरोनाचे स्वरूप बदलल्याने काळजी घेण्याचं आवाहन यावेळी खोतकर यांनी केले. तसेच, आगामी काळात लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवल्यास बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास खोतकर यांनी शेतकऱ्यांना दिला.
महत्वाच्या बातम्या
- ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शकपणे करा; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आवाहन
- पाण्याच्या टाकीत सापडले होते दोन सांगडे; 8 वर्षांनंतर अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
- राज्यात गारपीट, अवकाळी पाऊस; वीज पडून ६ ठार; शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान
- आरोग्यमंत्री राजेश टोपेंना कोरोनाची लागण
- कोटीच्या कोटी उड्डाणे : टॉप-५ बोलींमध्ये भारताचा केवळ एक खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

