Share

शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही- मुंडे

Published On: 

उस्मानाबाद : गेल्या १० दिवसात सलग पाऊस पडतोय. या सलग पडणाऱ्या पावसाने नुकसानीचे स्वरूप रोज बदलत चाललय. तरीपण नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून सुटणार नाही. त्याला महाविकास आघाडी सरकारकडून मदत करण्यात येईल. असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत, त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. धनंजय मुंडे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळा येथील कार्यक्रमात बोलत होते.

मुंडे म्हणाले की, ‘शेतकऱ्यांचा उभा ऊस आडवा झाला आहे. तसेच कापूस भिजला आहे, पाण्यातल्या सोयाबीनच कसं होईल? असा मला प्रश्न पडला आहे. राज्यातील कोणत्याही मंत्र्याने आजपर्यंत ४ वेळा नुकसान पाहणी दौरा केला नसेल पण आम्ही केला आहे. झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळणारच आहे, तसेच विमा मिळणारच आहे, ही आम्ही जबाबदारी घेतली आहे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाहीत. तुम्ही फक्त धीर खचू देऊ नका महाविकास आघाडी सरकार आपल्या पाठीशी आहे.’

ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांवर संकट आले तेव्हा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धावून आला आहे. आजही या संकटात आपण स्वतः ला एकटं समजू नका पवार साहेब आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!